Renowned Ayurvedacharya Balaji Tambe passes away at 81 in Pune


Ayurveda proponent Balaji Tambe passes away in Pune

Pune: Dr Balaji Tambe, an Ayurveda practitioner and proponent of Yoga, died at a private hospital in Pune on Tuesday following a brief illness, family members said

Pune: Dr Balaji Tambe, an Ayurveda practitioner and proponent of Yoga, died at a private hospital in Pune on Tuesday following a brief illness, family members said. He was 81.

The founder of “Atmasantulana Village”, a holistic healing centre near Lonavla, Tambe had written various books on spirituality, Yoga and Ayurveda.

He is survived by wife, two sons and daughters-in-law, and four granddaughters.

Maharashtra chief minister Uddhav Thackeray condoled his death, saying with the help of Ayurveda and Yoga, he brought about change in many people’s lives. “With the demise of Dr Tambe, we have lost a true proponent of Ayurveda, Yoga. His contribution will be remembered,” said Thackeray.


Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari expressed grief over Tambe’s death.

“Saddened to know about the demise of Ayurvedacharya Shri Balaji Tambe. He dedicated his entire life to promote and popularise Ayurveda and Yoga. Through his lucid writings and talks he showed the path of an exalted and healthy life to the people of all ages till last,” Koshyari said in his message.

 PUNE: Dr Balaji Tambe, a well-known spiritual leader who was also an Ayurveda doctor and proponent of Yoga, died at a private hospital here on Tuesday following a brief illness, sources close to his family said.

He was 81. The founder of 'Atmasantulana Village', a holistic healing centre near Lonavala, Dr Tambe had written several books on spirituality, Yoga and Ayurveda.

He is survived by his wife, two sons and daughters-in-law as well as four granddaughters.

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray condoled his death, saying with the help of Ayurveda and Yoga, he brought about change in many people's lives.

"With the demise of Dr Tambe, we have lost a true proponent of Ayurveda, Yoga. His contribution will be remembered," said Thackeray.

Governor Bhagat Singh Koshyari also expressed grief over Tambe's death. "Saddened to know about the demise of Ayurvedacharya Shri Balaji Tambe. He dedicated his entire life to promote and popularize Ayurveda and Yoga. Through his lucid writings and talks he showed the path of an exalted and healthy life to the people of all ages till last," Koshyari said in his message.


Balaji Tambe passes away : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe passes away) यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती.


पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe passes away) यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वृत्त ‘सकाळ’ने दिलं आहे. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.


बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते.


बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्य विषयक घडामोडींवर अत्यंत जागरुकपणे त्यांनी अनेक दशकं काम केलं. केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.


तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

योग आणि आयुर्वेद (Yoga and Ayurveda) या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe dies) यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं.

योग आणि आयुर्वेद (Yoga and Ayurveda) या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe dies) यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं.


पुणे, 10 ऑगस्ट : योग आणि आयुर्वेद (Yoga and Ayurveda) या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe passes away) यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी (81 years) मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


गेल्या आठवड्यात तांबे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेली. ते उपचाराला प्रतिसाद देईनासे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी गेली कित्येक वर्षं ते कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून या विषयातलं प्रबोधन करत असत. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केलं.


आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीत यांची सांगड घालून आयुष्य अधिक आरोग्यपूर्ण बनवता येऊ शकतं, हा संदेश ते गेली 5 दशकं देत राहिले. शास्त्रोक्त आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीतही त्यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. आयुर्वैदाचा त्यांनी भारतासह भारताबाहेरही प्रचार आणि प्रसार केला. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीचा उपयोग करून त्यांनी आयुर्वेदाची महती जगातील अनेक देशांमध्ये पोहोचवण्यात यश मिळवलं.


तांबे यांच्या गर्भसंस्कार (Garbhasankar) या पुस्तकाचंही काही वर्षांपूर्वी प्रकाशन झालं होतं. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला होता. त्याच्या लाखो प्रति विकत घेत नागरिकांनी त्यांच्या पुस्तकावर प्रेमाची उधळण केली होती.


‘बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरके झाले’, शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तांबे यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली. बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरके झाले, असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.


'बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरके झाले', शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

balaji tambe


मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तांबे यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली. बालाजी तांबे यांच्या निधनानं विशाल वैश्विक कुटुंब पोरके झाले, असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. (Tribute to Balaji Tambe from NCP President Sharad Pawar)


‘ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’, अशा शब्दात शरद पवार यांनी बालाजी तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे, असं फडणवीस म्हणाले.

Tributes

Friends, Family and loved ones are extremely sad and currently grieving as the news of Balaji Tambe death was made known to the public.

Though our words can do little, we hope our thoughts and prayers will encourage you this period and always as you mourn, the passing soul.

May you find comfort knowing that life continues forever in heaven even as the memories shared live forever in our hearts.

Obituary | Funeral Arrangement | GoFundMe page

At the moment, we are not sure if any GoFundMe account was created on behalf of the dead person, either to fund the funeral arrangements or created on behalf of the family.

Although funeral arrangements is yet to be announced, it goes without saying the family is dealing with a devastating loss and could use your support. On behalf of the family, we are asking for your prayers, love, and support during this very difficult and painful time for them.

If there is any GoFundMe page created or any information you think we should know about, kindly use the comment section or contact us, using our contact us page.

Little acts such as tributes and prayers can go a long way to heal the family of their loss and remind them the world still loves them.

This post will be updated with more information as they are made available and public.


बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी; म्हणाले “बोलवा रे त्या सगळ्यांना!”

बालाजी तांबे यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी थेट काठीच हातात घेतली होती.

लोकसत्ता ऑनलाइन | August 10, 2021 05:42 pm


SHARE



बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी; म्हणाले “बोलवा रे त्या सगळ्यांना!”

बालाजी तांबेंनी तक्रार करताच बाळासाहेबांनी हातात घेतली काठी!

तब्बल पाच दशकं आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रसार आणि प्रचाराचं कार्य करणारे आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. बालाजी तांबेंचं आयुर्वेदातील कार्य फक्त स्थानिक, राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न राहाता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या उपचारपद्धतींना मानणारा एक मोठा वर्ग होता. राजकारण ते समाजकारण आणि उद्योग जगत ते सिनेविश्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार देखील होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता. एबीपी माझा वाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयीची आपली एक आठवण देखील सांगितली होती.


MTDCचा बंगला आणि बाळासाहेबांकडे तक्रार

बालाजी तांबे त्या काळी एमटीडीसीच्या एका बंगल्यात भाड्याने राहात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बालाजी तांबेंच्या बंगल्यावर मुक्काम केला. यावेळी बालाजी तांबे यांनी केलेल्या तक्रारीनंतर चक्क बाळासाहेब ठाकरेंनी हातात काठी घेऊन सगळ्यांचीच शाळा घेतल्याची आठवण बालाजी तांबेंनी सांगितली होती.

बाळासाहेब ठाकरे बालाजी तांबेंच्या बंगल्यावर राहाण्यासाठी आले असताना त्यांना सगळीकडे अस्वच्छता दिसली. बंगल्याच्या आजूबाजूला कचरापट्टी झाली होती. याबाबत त्यांनी बालाजी तांबे यांना विचारणा केली होती. तेव्हा बालाजी तांबेंनी आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली. “मी त्यांना सगळं सांगितलं. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे, आम्ही स्वच्छतेवरच सगळी लक्ष्मी कमावली आहे वगैरे. पण कुणी काही ऐकतच नाही”, असं बालाजी तांबेंनी बाळासाहेबांना सांगितलं.

Balasaheb thackeray with balaji tambeबाळासाहेब ठाकरेंसोबत बालाजी तांबेंचं होतं अनोखं नातं 

…आणि बाळासाहेबांनी सोडलं फर्मान!

बाळासाहेबांनी हे सगळं ऐकलं आणि तडक एक काठीच हातात घेतल आणि फर्मान सोडलं, “बोलवा रे त्या सगळ्यांना”. बाळासाहेबांचा हा पवित्रा पाहून बालाजी तांबेंनी विचारलं, “बाळासाहेब, तुमची युनियन आहे का इथे?” त्यावर बाळासाहेब उत्तरले, “माझं युनियन नाही. पण मी दाखवतो युनियनशिवाय कशी कामं होतात ते!”

बालाजी तांबे या मुलाखतीमध्ये म्हणतात, एवढं बोलून बाळासाहेबांनी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना दरडावलं, की लगेच सगळीकडे स्वच्छता करा, रोपं लावा. मी जाईपर्यंत इथे सगळं हिरवं दिसलं नाही, तर या काठीने एकेकाला दाखवतो!

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बालाजी तांबेंचा असा दिग्गज मित्र परिवार पाहायला मिळतो.

No comments:

Post a Comment